Happy Birthday Rajinikanth | बस कंडक्टरच नाही तर कधीकाळी कुली म्हणूनही काम केलं, ‘या’ व्यक्तीमुळे रजनीकांत मनोरंजन विश्वात आले!

| Updated on: Dec 12, 2021 | 8:45 AM

दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरू येथे झाला. लोकांची त्यांच्याबद्दलची क्रेझ इतकी आहे की, ते त्यांना 'देव' मानतात.

1 / 5
दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरू येथे झाला. लोकांची त्यांच्याबद्दलची क्रेझ इतकी आहे की, ते त्यांना 'देव' मानतात. पहाटे 3.30 पर्यंत रजनीकांत यांचे चित्रपट प्रदर्शित होतात. कुली ते सुपरस्टार बनलेले रजनीकांत हे मित्र राज बहादूर याने अभिनेता होण्याचे स्वप्न त्यांच्यात जिवंत ठेवले नसते, तर आतापर्यंत इथवर कधीही पोहोचले नसते.

दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरू येथे झाला. लोकांची त्यांच्याबद्दलची क्रेझ इतकी आहे की, ते त्यांना 'देव' मानतात. पहाटे 3.30 पर्यंत रजनीकांत यांचे चित्रपट प्रदर्शित होतात. कुली ते सुपरस्टार बनलेले रजनीकांत हे मित्र राज बहादूर याने अभिनेता होण्याचे स्वप्न त्यांच्यात जिवंत ठेवले नसते, तर आतापर्यंत इथवर कधीही पोहोचले नसते.

2 / 5
शिवाजी राव गायकवाड (रजनीकांत) हे त्यांचे वडील रामोजी राव यांच्या चार मुलांपैकी सर्वात लहान होते. ते पाच वर्षांचे असताना त्यांची आई जिजाबाई यांचे निधन झाले. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने रजनीकांत यांना कुली म्हणून काम करावे लागले. तर, मोठे झाल्यावर ते बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करू लागले.

शिवाजी राव गायकवाड (रजनीकांत) हे त्यांचे वडील रामोजी राव यांच्या चार मुलांपैकी सर्वात लहान होते. ते पाच वर्षांचे असताना त्यांची आई जिजाबाई यांचे निधन झाले. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने रजनीकांत यांना कुली म्हणून काम करावे लागले. तर, मोठे झाल्यावर ते बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करू लागले.

3 / 5
रजनीकांत यांना अभिनेता व्हायचे होते. त्यांचे हे स्वप्न मित्र राज बहादूर याने कायम जिवंत ठेवले आणि नंतर त्यानेच रजनीकांत यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. मित्रामुळे रजनीकांत यांनी पुढे पाउल टाकले आणि नंतर ते चित्रपटात काम करू लागले.

रजनीकांत यांना अभिनेता व्हायचे होते. त्यांचे हे स्वप्न मित्र राज बहादूर याने कायम जिवंत ठेवले आणि नंतर त्यानेच रजनीकांत यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. मित्रामुळे रजनीकांत यांनी पुढे पाउल टाकले आणि नंतर ते चित्रपटात काम करू लागले.

4 / 5
रजनीकांत यांनी 1975मध्ये रिलीज झालेल्या 'अपूर्व रागांगल' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत कमल हसन आणि श्रीविद्या यांसारख्या बड्या स्टार्सनीही काम केले होते. रजनीकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक नकारात्मक भूमिका केल्या.

रजनीकांत यांनी 1975मध्ये रिलीज झालेल्या 'अपूर्व रागांगल' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत कमल हसन आणि श्रीविद्या यांसारख्या बड्या स्टार्सनीही काम केले होते. रजनीकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक नकारात्मक भूमिका केल्या.

5 / 5
'भुवन ओरु केल्विकुरी' या चित्रपटात रजनीकांतने पहिल्यांदाच नायकाची भूमिका साकारली होती. त्यांचा 'बिल्ला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि त्यामुळे रजनीकांत लोकांच्या नजरेत आले. 1983 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘अंधा कानून’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. यानंतर रजनीकांत केवळ यशाच्या शिखरावर चढत राहिले. आज त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार म्हटले जाते.

'भुवन ओरु केल्विकुरी' या चित्रपटात रजनीकांतने पहिल्यांदाच नायकाची भूमिका साकारली होती. त्यांचा 'बिल्ला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि त्यामुळे रजनीकांत लोकांच्या नजरेत आले. 1983 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘अंधा कानून’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. यानंतर रजनीकांत केवळ यशाच्या शिखरावर चढत राहिले. आज त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार म्हटले जाते.