- Marathi News Photo gallery Cinema photos Ratris Khel Chale 3 upcoming episode updates will purva get married to abhiram
रात्रीस खेळ चाले ३: माईची पुण्याई जिंकणार की शेवंता-अण्णांची सूड भावना?
Ratris Khel Chale 3: मालिकेचं कथानक रंजक वळणावर पोहोचली असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले ३' या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेचं कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

अण्णा आणि शेवंताला लग्न करायचं आहे आणि त्यासाठी दोघंही शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सयाजी आणि कावेरी यांना वश करून आपला डाव साधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण वच्छीमुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत.

अण्णा आणि शेवंताचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या वाड्यात कुठलंच मंगलकार्य होऊ द्यायचं नाही असं अण्णा आणि शेवंता मनाशी पक्क करतात. इतक्यातच अभिराम पूर्वाच्या लग्नाची तयारी करतोय.

या लग्नातही काही तरी विघ्न येणार अशी चाहूल वच्छीला लागते. काहीही झालं तरी हे लग्न निर्विघ्न पार पाडायचं अभिराम ठरवतो.

पूर्वाची लग्नघटिका समीप आली आहे.

आता माईंची पुण्याई यावेळी कामी येणार की अण्णा आणि शेवंताची सूड भावना नाईकांच्या सुखात मिठाचा खडा टाकणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.