
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रातील बाबी आजही तंतोतंत लागू होतात.त्यामुळे चाणक्य नीतीतील श्लोकांचा लोकं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. निर्धनं पुरुषं वेश्या प्रजा भग्नं नृपं त्यजेत् | खगा वीतपलं वृक्षं भुक्त्वा चाभ्यागतो गृहम् ||

वेश्येचं काम परपुरुषांचं धन लूटणं असतं. त्या व्यक्तीचं पैसा संपला की त्याच्याकडे लक्षही देत नाही.

प्रजा प्रतापी राजाला सन्मान देते. जेव्हा तो शक्तिहीन होतो तेव्हा जनता त्याची साथ सोडते.

पक्षी झाडावर सावली आणि फळ मिळेपर्यंत वास्तव्य करतात. त्यानंतर ते तेथून निघून जातात.

त्याचबरोबर घरी आलेला अतिथी भोजन झाल्यानंतर घर सोडून जातो.