
कॉफी - कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या शरीराला अलर्ट करीत असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच ब्लड शुगर लेव्हल देखील प्रभावीत होऊ शकते.

मिठाई - सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर वाढू शकते. त्यामुळे काही वेळाने पुन्हा भूक लागते. याशिवाय गोड पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो असे तज्ज्ञाचे मत आहे.

फळे - फळे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू रिकाम्या पोटी फळे खाण्यापासून वाचले पाहीजे. विटामिन्स सी अधिक असूनही जर सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ली तर पोटाच्या आत जळजळ होऊ शकते. त्यामुळे एसिडीटी किंवा अपचन होण्याची शक्यता असते.

तळलेले पदार्थ - तळलेले पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरी जास्त असते.जी आपल्या पचन यंत्रणेला प्रभावित करीत असते. या खाद्यपदार्थांना पचविणे कठीण असते.त्यामुळे बद्धकोष्ठता, एसिडीटीसारखी समस्या निर्माण होऊ शकते.

दही - दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड मोठे असते. परंतू रिकाम्या पोटी सकाळी दही खाण्याने पोटात एसिडीटी होऊ शकते. दह्याला फळांच्या सलाड सोबत किंवा अन्नपदार्थांसोबत खायला हवे.