AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदूंनी किती मुलं जन्माला घालावीत? योजनेवरून केजरीवाल यांचा खोचक टोला

मोहन भागवत यांनी हिंदूंना अधिकाधिक मुलं जन्माला घालायला सांगितलं आहे, तर रेखा गुप्ता यांनी तीनपेक्षा जास्त मुलांच्या आईवडिलांना सरकारी योजनेचा लाभ देण्यास नकार दिला आहे. यावरून आता अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला आहे.

हिंदूंनी किती मुलं जन्माला घालावीत? योजनेवरून केजरीवाल यांचा खोचक टोला
अरविंज केजरीवाल, रेखा गुप्ताImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2026 | 2:23 PM
Share

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. दोघांच्या वक्तव्यांमुळे आता हिंदूंमध्ये किती मुलं जन्माला घालावीत याबद्दल संभ्रम निर्माण होत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मोहन भागवतजी म्हणत आहेत की प्रत्येक हिंदू व्यक्तीने शक्य तितकी जास्त मुलं जन्माला घालावीत. रेखा गुप्ता म्हणत आहेत की तीनपेक्षा जास्त मुलं असल्यास दिल्लीत लक्ष्मी योजनेचा लाभ मिळणार नाही.’

‘बिचारे हिंदू संभ्रमात आहेत. रेखाजी आणि भागवतजी यांनी मिळून सांगावं की हिंदूंनी अखेर काय करावं’, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. दिल्ली लक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी महिलेचं वय 21 ते 60 वर्षांदरम्यान असावं लागतं. तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं. महिला किमान 10 वर्षांपासून दिल्लीची कायम रहिवासी असावी आणि तिला तीन किंवा त्यापेक्षा कमी मुलं असावीत. पात्रतेचे हे निकष पूर्ण केल्यावरच सरकार दरमहा 2500 रुपयांची आर्थिक मदत देईल. तर दुसरीकड मोहन भागवत यांनी लोकसंख्येचं संतुलन, घटणारा जन्मदर यांचा हवाला देत हिंदू कुटुंबांना किमान तीन किंवा अधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे.

केजरीवाल यांची पोस्ट-

आरएसएसच्या शताब्दीनिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले होते, “मी सर्व भारतीयांना तीन मुलं जन्माला घालण्याचा सल्ला देईन. जगातील सर्व धर्मग्रंथ सांगतात की, ज्या देशांमध्ये जन्मदर तीनपेक्षा कमी असतो, ते हळूहळू नामशेष होतात. त्यामुळे तो दर तीनपेक्षा जास्तच राखला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, डॉक्टर मला सांगतात की लग्नाला जास्त उशीर करू नये आणि तीन मुलं असण्याने आईवडील आणि मुलं दोघांचंही आरोग्य सुधारतं. तीन मुलं असलेल्या कुटुंबात मुलं आपापसातील अहंकाराचं व्यवस्थापन करायला शिकतात. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही.”

Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप