
धुके हे ढगासमान असते. त्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात. हे बिंदू हवेत लटकलेले असतात. त्यामुळे त्याचे एका प्रकारचे ढगच तयार होत असते. यावर उंच सखलतेचा आणि वाऱ्याच्या वेगाचा फार जास्त असर पडतो.

उत्तर भारतात धुके असे नेहमी दिसते. महाराष्ट्रात हिल स्टेशनच्या परिसरात धुक्याचे प्रमाण सकाळी, सकाळी असते. त्यानंतर कडक ऊन पडल्यावर धुके दिसत नाही. आता पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर असे धुक्याची चादर दिसून आली.

धुक्याची ही चादर पुणे जिल्ह्यातील मावळामध्ये दिसली. मावळ तालुका आपल्या निसर्ग संपन्नतेमुळे सर्वत्र परिचित आहे. यामुळे या तालुक्यात भटकंती करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्याच मावळमधील मळवली रेल्वे स्टेशनवर असे दृश्य दिसले.

मावळमध्ये धुक्याची चादर पसरल्यामुळे निसर्ग अधिकच चांगला दिसू लागला. गुरुवारी सकाळी मळवली रेल्वे स्टेशनवर धुक्याची चादर पसरली होती. त्यात रेल्वेचे आगमन झाल्यामुळे प्रवासी समाधानी झाले. धुक्यात जाण्याचा आनंद त्यांनी घेतला.

धुक्यामुळे रेल्वे, विमाने उड्डाण रद्द होतात. कारण समोरची दृश्यता कमी असल्यामुळे काहीच दिसत नाही. यामुळे महामार्गावर वाहतूक संथ गतीने चालते. त्यानंतर अपघाताचे प्रसंग घडतात. धुक्याचा हा खेळ थंड हवेच्या ठिकाणी असतो.