
आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस जवळ आला आहे. येत्या ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, याच जयघोषात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस खूप खास आहे. कारण या दिवस काही खास गोष्टी केल्यास तुम्हाला वर्षभर बाप्पाचा आशीर्वाद मिळतो.

बाप्पाला निरोप देण्यापूर्वी काही दुर्वा आणि हळद एका लाल कपड्यात बांधून त्याची एक पोटली तयार करा. आधी ती बाप्पाच्या चरणी ठेवा. नंतर ही पोटली आपल्या घरातील तिजोरीत ठेवा. यामुळे घरात कधीच पैशांची कमतरता भासत नाही.

बाप्पााच्या विसर्जनाच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्या. यामुळे बाप्पा खूप खुश होतात. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात. तसेच या दिवशी गरजूंना जेवण, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करा. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मिळतो.

अनंत चतुर्दशी दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. हिरवी फळे, मिठाई किंवा इतर हिरव्या वस्तूंचे दान करा. यामुळे तुमच्या कामात प्रगती होते. तसेच करियरमध्ये यश मिळतं.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)