
घरातील वीज एका मिनिटासाठी जरी गेली तरी आपण अस्वस्थ होऊन जातो. विजेच्या जोरावरच आजघडीला एसी, कुलर, फ्रिज अशी उपकरणं चालतात. त्यामुळेच विजेला फार महत्त्व आहे.

आपण मानवनिर्मित विजेचा उपयोग करतो. याच विजेच्या जोरावर आपली अनेक दैनंदीन कामे होतात. पण नैसर्गिक विजेमध्येही मोठी शक्ती असते. या नैसर्गिक विजेचा एकदा प्रकोप झाल्यास सगळं उद्ध्वस्त होतं. त्यामुळेच नैसर्गिक विजेपासून दूर राहावे असे म्हटले जाते.

आपल्या घरात जी वीज असते ती 120 व्होल्टची असते. या विजेचा झटका बसला तरी माणसाचा जागेवर मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील विजेच्या उपकरणांपासून दूर राहवे असे सांगितले जाते.

पण आकाशात चमकणाऱ्या विजेचे प्रवाह तब्ब 10 कोटी व्होल्ट असतो असे म्हटले जाते. विशेष म्हणजे ही वीज तब्बल 4 ते 5 किमी असते. आकाशात चमकणाऱ्या या विजेचे तापमानही जास्त असते. ही वीज हवेला तब्बल 30 हजार अंशसेल्सिअसपर्यंत गरम करू शकते.

त्यामुळेच आकाशातील विजेच्या धक्क्यामुळे एखादे महाकाय वृक्ष उन्मळून पडते. तसेच माणसाच्या अंगावर वीज पडल्यावरही संबंधित व्यक्तीचा लगेच मृत्यू होतो.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)