
टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील पहिला वन जे सामना टाय झाला आहे. पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 230-8 धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी यजमान श्रीलंकेला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यापासून रोखलं. टीम इंडियालाही श्रीलंकेने ऑल आऊट करत सामना टायवर सोडवला. टीम इंडियाला श्रीलंकेने बॅकफूटला ढकललं.

टीम इंडियाकडून सलामीला कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल आले होते. दोघांनी दमदार फलंदाजी करत श्रीलंकेवर दवाब टाकला होता. रोहित शर्माने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र तो आऊट झाल्यावर सर्व खेळाडू झटपट आऊट झाले.

दोघांनी 75 धावांची सलामी दिली होती, शुबमन गिल 16 धावा करून परतला. त्यानंतर रोहित शर्माही स्वीप शॉट मारण्याच्या नादात आऊट झाला.

दोन विकेट गेल्यावर चार नंबरला के.एल. राहुल येणार असं सर्वांना वाटलं होतं. मात्र गंभीर आणि टीम मॅनेटमेंटने सर्वांनाचा सरप्राईज केलं. सामन्याचा हाच मोठा टर्निंग पॉईंट ठरला असं चाहते म्हणत आहेत.

चार नंबरला वॉशिंग्टन सुंदर खेळायला आला, गौतम गंभीरने हा बदल केला खरा पण याचा काहाही फायदा झालेला दिसला नाही. कारण आधीच टीम इंडियाच्या विकेट गेलेल्या असताना चौथ्या नंबरवर आलेला सुंदरही 5 धावा करुन आऊट झाला. गंभीरची हा चाल फेल ठरली. परिणामा त्याची विकेट वाया गेली आणि टीम इंडिया ऑल आऊट झाली. 14 बॉलमध्ये फक्त 1 धावेची गरज होती. तेव्हा चरिथने 48 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या बॉलवर शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह या दोघांना सलग आऊट केलं आणि सामना टाय झाला.