
हिंदू धर्मात कापुराला फार महत्त्व आहे. पूजा करताना कापूर जाळला की देव प्रसन्न होतो असे बोलले जाते. सोबतच कापुरामुळे नकारात्मकता दूर होते आणि वाईट नजरेपासून संरक्षण होते.

हिंदू धर्मात कापराला पवित्र मानले जाते. मान्यतेनुसार कापूर घरात जाळला की घरात सकारात्मकता नांदते तसेच सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. विशेषत: सकाळी आमि संध्याकाळी घरात कापूर जाळणे शूभ मानले जाते.

श्रावण महिन्यात भगवान महादेवापुढे कापूर जाळणे अत्यंत शूभ मानले जाते. शिवलिंगाची कापूर आरती केल्याने नकारात्मकता दूर होते तसेच शिवाची कृपा कायम राहते, असे सांगितले जाते.

मंदिरात शुद्ध कापूराचा वापर करावा. कापूर हा नेहमी पूजेच्या ताटात ठेवायला हवा. पूजेनंतर कापूर ठेवलेले ताट संपूर्ण घरात फिरावावे. घरात तणावपूर्ण स्थिती असेल तर कापूर जाळावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा संपते. घरातही रोज कापूर जाळावा असे सांगितेल जाते. त्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते तसेच नकारात्मकता दूर होते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.