
चमकदार त्वचा सर्वांनाच हवी असते. यासाठी विविध उपाय केली जातात. अनेकजण चांगल्या त्वचेसाठी तूप लावतात तर काही जण मलाई लावतात. मात्र, प्रश्न पडतो की, तूप की मलाई दोन्हीपैकी त्वचेसाठी अधिक फायदेशीर काय आहे.

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मलाई आणि तूप वापरले तर सकाळी तुमची त्वचा मॉइश्चरायझ होते. मुळात म्हणजे दोन्ही तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

मलाईमध्ये चरबी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यासह अनेक जीवनसत्त्वे असतात, जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

तुपाबद्दल बोलायचे झाले तर त्यात जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि के, तसेच निरोगी चरबी आणि ब्युटीरिक अॅसिड असते.जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

तुम्ही एक दिवस तूप आणि दुसरे दिवसी मलाई चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचा तजेलदार आणि मुलायम होण्यास मदत होते.