
जास्त मिरच्या खाल्ल्याने दम्याचा झटका येऊ शकतो. म्हणून, जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल किंवा कोणत्याही श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुम्ही मिरच्या विशेषत: लाल मिरच्यांचे सेवन टाळावे.

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांनी मिरचीचे अजिबात सेवन करू नये. अन्यथा यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता असते. याशिवाय ज्यांना आधीच मूळव्याधची समस्या आहे. त्यांनी मिरचीचे सेवन केल्याने त्यांची समस्या वाढू शकते.

ज्या लोकांना त्वचेची समस्या आहे किंवा बऱ्याचदा त्वचेवर पुरळ, खाज सुटणे त्यांनीही मिरचीचे सेवन करणे टाळावे. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसीन असते. जे ही समस्या आणखी वाढवते.

ज्या लोकांना पोटात अल्सरची समस्या आहे. अशा लोकांनी मिरचीचे सेवन पूर्णपणे टाळावे. मिरची खाल्ल्याने जखमा अधिक खोल होतात आणि समस्या खूप गंभीर बनते.

ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे. त्यांनी मिरची खाणे टाळावे. विशेषत: लाल मिरची अजिबात खाऊ नये. अन्यथा अॅसिडिटी जास्त वाढते. या व्यतिरिक्त, जे लोक जास्त मिरची खातात. त्यांना अतिसाराची समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.