Photo Gallery : हंगामाची सुरवात अन् शेवट सर्वकाही पाण्यातच, द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका

नाशिक : निसर्गाचा लहरीपणा आणि द्राक्ष उत्पादकांनी त्याच्याशी केलेले दोन हात. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण द्राक्षतोड होत असतानाही निसर्गाने द्राक्ष उत्पादकांवर कृपादृष्टी दाखवलेली नाही. अखेर नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. यापुर्वी अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव नंतर वाढत्या थंडीतून बचाव व्हावा म्हणून रात्रीचा दिवस करुन द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या हे सर्व करुन आता कुठे तोड सुरु असताना होत असलेल्या पावसामुळे द्राक्षांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. एकीकडे दर्जा खालावला म्हणून अपेक्षित दर नाही हे कमी म्हणून की काय आता होत असलेल्या पावसामुळे द्राक्ष विक्री होते की नाही याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे.

| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 09, 2022 | 10:48 AM
1 / 4
गोडवा उतरणारच नाही : मध्यंतरीच्या थंडीमुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षामध्ये गोडवा उतरलाच नव्हता. त्यामुळे आता उनामध्ये वाढ झाली तरी द्राक्ष गोड होणार होती. पण निसर्गाच्या मनात काही औरच होते. भर ऊन्हाळ्याच्या तोंडावर पावसाळ्याप्रमाणे  वातावरण झाले आहे. त्यामुळे द्राक्षामध्ये गोडवा निर्माण होणार की नाही याबाबत शंका आहे.

गोडवा उतरणारच नाही : मध्यंतरीच्या थंडीमुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षामध्ये गोडवा उतरलाच नव्हता. त्यामुळे आता उनामध्ये वाढ झाली तरी द्राक्ष गोड होणार होती. पण निसर्गाच्या मनात काही औरच होते. भर ऊन्हाळ्याच्या तोंडावर पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले आहे. त्यामुळे द्राक्षामध्ये गोडवा निर्माण होणार की नाही याबाबत शंका आहे.

2 / 4

आता थेट घडावर परिणाम: अवकाळीमुळे बागांवर परिणाम झाला तर औषध फवारणी करुन पुन्हा बागा जोमात आणल्या जात होत्या पण सध्याच्या पावसामुळे थेट द्राक्षावरच परिणाम होत आहे. द्राक्ष काळवंडले जात असून तोडणीसाठी अडचणी निर्माण होणार आहेत. या पावसामुळे द्राक्षाचे दुहेरी नुकसान होणार आहे.

3 / 4

रासायनिक कीडनाशकाच्या फवारणीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते.

4 / 4

विजेचा कडकडाट अन् जोराचा पाऊस : निसर्गाची अवकृपा यंदा नाशिक जिल्ह्यावरच काही अधिकच राहिलेली आहे. द्राक्ष उत्पादन घेताना दोन दिवसातून एकदा औषध फवारणी ही करावीच लागते. पोटच्या लेकरापेक्षा या बागांची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागत असताना सततच्या नुकसानीमुळे यंदा उत्पादनावरील खर्चात वाढ झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us