30 ते 40 किमी वेगाने वारे, तब्बल 19 राज्यात पावसाचा इशारा, गारपिटीचे संकट..
Weather Update : राज्यासह देशात पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हनामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस पाऊस कायम असणार आहे.

देशातील विविध भागात मुसळधार पाऊस आहे. त्यामध्येच राज्यात आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड, ओडिसा या राज्यात तर पावसाने कहर केला. मुसळधार पावसाने पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

तब्बल 19 राज्यात भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यात आजही पावसाचा इशारा दिला. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला.

दिल्लीत आज पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. 30 ते 40 किमी वेगाना वारे वाहण्याची शक्यता आहे. हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथे जोरदार पाऊस होईल.

भारतीय हवामान विभागाने तब्बल 19 राज्यात पावसाचा इशारा दिला. महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली. राज्यात मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने थैमान घातले.

रात्रभर अनेक भागात पाऊस झाला. सकाळीही पावसाने हजेरी लावली. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक असल्याचे सांगितले जातंय.