
26/11 या दिवशी 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेकां जीव गमवावे लागले. यात पोलीस अधिकारी आणि जवानांनी प्राणांची आहुती दिली.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी आणि जवानांना वीर मरण आलं. यांच्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात पोलीस स्मारकाला उभारण्यात आलं आहे.

याठिकाणी आज या हुतात्मांना अभिवादन करण्यात आलं. पोलीस आणि लष्कराच्या जवानांना शहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पांजली अर्पण केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय या ठिकाणी जात आदरांजली अर्पण केली. शहिदांच्या स्मृतींना पुष्पचक्र अर्पण केलं.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर, डीजीपी, सीपी हे देखील उपस्थित होते. यावेळी 26/11 च्या हल्ल्याच्या भळभळत्या जखमेवर भाष्य करण्यात आलं.