
'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' पासून ओळखला जाणारा राजू श्रीवास्तव "क्लीन कॉमेडी" साठी ओळखला जायचा. 2010 मध्ये, राजू श्रीवास्तव यांनी दावा केला होता की, त्याच्या रिॲलिटी शोमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानवर विनोद केल्यावर त्याला पाकिस्तानमधून धमकीचे कॉल आले होते.

राजू श्रीवास्तव यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक समाजवादी पक्षाकडून लढवली.पुढे पक्षाच्या स्थानिक घटकांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही असं कारण देत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग होण्यासाठी प्रसिद्ध विनोदी कलाकारांची निवड केली होती. राजू स्वच्छ भारत अभियान मोहिमेसाठी टीव्ही जाहिराती आणि व्हिडिओंचा देखील भाग होता.

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या पत्नीसह स्टार प्लसच्या 'नच बलिये' रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. कपिल शर्मा, जो राजू श्रीवास्तवचा जवळचा मित्र होता, त्याने त्याला त्याच्या 2019 च्या 'फिरंगी' चित्रपटात एका खास भूमिकेत कास्ट केले.

राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराचा झटका आला, ते जिममध्ये कसरत करत होते, त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली. 21 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचे निधन झाले.