
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहोचले.

ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत भारतीयांना घेऊन मुंबईला पोहोचणारे एअर इंडियाचे हे चौथे विमान आहे.

या विमानाने 180 भारतीय नागरिकांना रोमानियातून आणले आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुंबई विमानतळावर पोहोचले होते.

मुंबई विमानतळावर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी तिरंगा घेऊन मुलांचे स्वागत केले.

युक्रेनमधून मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, तिथली परिस्थिती खूप वाईट आहे, अजूनही अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या भागात अडकले आहेत.

रशियाने बॉम्ब हल्ले करून युक्रेनमधील अनेक मोठी शहर उद्वस्त केली आहेत, त्यामुळे तिथं अधिक भीतीखाली लोक आयुष्य जगत आहेत