
ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल राग आहे त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवावे. तुमच्या कर्तृत्वाचा किंवा संपत्तीचा राग करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. त्यांच्या नकारात्मक भावनांमुळे तुमचं नुकसान होऊ शकते. काही चांगल्या संधी ते तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत.

कोणतेही नाते, मग ते प्रेम असो किंवा मैत्री, विश्वासाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. विश्वास नसलेल्या किंवा अप्रामाणिक असलेल्या लोकांपासून दूर राहावे. अशा व्यक्तींशी संबंध ठेवल्याने विश्वासघात होऊ शकतो किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनातील मौल्यवान माहिती गमावली जाऊ शकते.

मूर्ख व्यक्तींपासून कायम अंतर ठेवावं. कारण त्यांच्या कृतींचा तुमच्या स्वतःच्या निर्णयांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचे होणारं कामही बिघडू शकते.

माणसाचा सर्वात मोठा शत्रू आळस आहे. चाणक्य नुसार ज्या लोकांमध्ये नेहमी आळस जास्त असतो किंवा ज्यांच्यात महत्वाकांक्षा कमी असते अशा लोकांपासून दूर राहा. त्यांच्यातील प्रेरणेचा अभाव तुमच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतो किंवा तुम्हाला रसातळाला नेऊ शकतो.

अहंकारामुळे व्यक्तीचे पतन होते. अति अहंकार किंवा अहंकारपणे वागणाऱ्या लोकांपासून नेहमी अंतर ठेवावे. त्यांच्या वागण्यामुळे नात्यात अनावश्यक वाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे तुमचा मान-सन्मानही दुखावला जाऊ शकतो.