
गुजरातमधील बिपरजॉय चक्रीवादळ गेले. परंतु या चक्रीवादळाने आपल्या मागे पाऊलखुणा कायम ठेवल्या.

गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. हजारो गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्यात केली आहे.

या चक्रीवादळामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. परंतु सरकारने केलेल्या उपाययोजनामुळे जिवीत हानी झाली नाही. यासाठी ओडिशा मॉडलचा वापर करण्यात आला.

गुजरातसह दक्षिण-पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. चक्री वादळाच्या 72 तास आधी गुजरात सरकारने 8 अतिजोखमीच्या जिल्ह्यांमधील सुमारे 1 लाख लोकांचे स्थालांतर केले होते.

एनडीआरएफच्या 19 तुकड्या, एसडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मदतकार्यात गुंतलेल्या गुजरात पोलिस कर्मचाऱ्यांना सॅटेलाइट फोन देण्यात आले.

गुजरातसह दक्षिण-पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. आता शनिवारीही त्याचा प्रभाव ओसरणार आहे

गुजरामधील नुकसानीची पाहणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना उपयोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.