
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. केएल राहुल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. केएलने मॅचविनिंग खेळी साकारली. 91 बॉलमध्ये नाबाद 75 धावांची खेळी केली.

मोहम्मद शमी टीम इंडियासाठी यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने बॉलिंग अटेकने कांगारुंना तंगवलं. शमीने 6 ओव्हरमध्ये 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

रविंद्र जडेजा याने बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग या तिन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली. जडेजाने बॉलिंग करताना 9 ओव्हगरमध्ये 46 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने मार्नस लाबुशेन याचा अफलातून कॅच घेतला. तर केएल राहुल याच्यासोबत बॅटिंग करताना 45 धावांची निर्णायक आणि नाबाद विजयी खेळी केली.

मोहम्मद सिराज यानेही या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. सिराजने 5.4 ओव्हरमध्ये 29 धावा देत 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

कॅप्टन हार्दिक पंडया यानेही अष्टपैली कामगिरी केली. हार्दिकने 5 ओव्हरमध्ये 29 धावा देत 1 विकेट घेतली. तर 31 बॉलमध्ये 25 रन्स केल्या.