
मुंबईने विदर्भावर पाचव्या दिवशी 169 धावांनी मात करत रणजी ट्रॉफी जिंकली. विदर्भाला 538 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना ऑलआऊट 368 धावाच करता आल्या.

मुंबईचा अनुभवी गोलंदाज आणि अखेरचा सामना खेळत असलेल्या धवल कुलकर्णी याने विदर्भाची 10 वी आणि विजयी विकेट घेतली. धवलने अशाप्रकारे आपल्या कारकीर्दीचा अविस्मरणीय शेवट केला.

धवलने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. धवलला सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं. धवलने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली.

धवलला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच क्रिकेट चाहत्यांनी धवलला साश्रू नयनांनी निरोप दिला. धवललाही यावेळेस भावना अनावर झाल्या

धवल कुलकर्णी याच्यासाठी त्याचा गेल्या अनेक वर्षांचा सहकारी आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने इंस्टाग्रामवर मराठीत स्टोरी शेअर केली आहे.

रोहितने आपल्या इंस्टा स्टोरीत धवलचा फोटो पोस्ट केलाय. तसेच रोहितने धवलच्या या फोटोला 'मुंबईचा योद्धा' असं कॅप्शन दिलंय. रोहितची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दरम्यान मुंबईने 6 वर्षानंतर रणजी ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. तसेच मुंबईची रणजी ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण 42 वी वेळ ठरली.