
टीम इंडिया आणि अमेरिका संघातील सामना सात विकेटने भारताने जिंकला आहे. हा सामना जिंकत आपला सलग तिसरा विजय भारताने मिळवत सुपर 8 मधील आपली जागा पक्की केली आहे. रोहितने या सामन्यात एक मोठा आणि साहसी निर्णय घेतला.

टीम इंडिया आणि अमेरिका सामन्यात रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर 110-8 धावा केल्या होत्या. या टीम इंडियाने 18.2 ओव्हरमध्ये 113-3 हे आव्हान पूर्ण केलं.

या सामन्यामध्ये संघात काही बदल होतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र रोहितने आपल्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे. कारण शिवम दुबे हा अत्यंत खराब फॉर्ममध्ये होता, त्यामुळे त्याच्या जागी संघात संजू सॅमसन याला मधळ्या फळीत फलंदाजीसाठी घ्यावं असं बोललं जात होतं.

शिवम दुबेच नाहीतर भारताचा स्टार खेळाडू सुर्याही खराब खेळत होता. मात्र आजच्या सामन्यात रोहितने संघात कोणताही बदल केला नाही. दोघांनाही खेळवलं आणि दोघे मॅचविनर ठरले, विजयी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

सुर्यकुमार यादव याने नाबाद ५० (2 चौकार, 2 षटकार) तर शिवम दुबे नाबाद 31 धावा (1चौकार, 1षटकार) खेळी केली.