
कांगारुंना त्यांच्याच भूमीवर चारी मुंड्या चित करुन विजयी टीम इंडिया मायदेशी परतली.

भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं.

टीम इंडियाच्या विजयात कर्णधार अजिंक्य रहाणेचा मोठा वाटा आहे.

अजिंक्यच्या अद्वितीय नेतृत्वाखाली भारताने मिळवलेल्या या दमदार यशानंतर चाहते, कुटुंबीयही आनंदात आहेत.

मुंबईतील घरी परतलेल्या अजिंक्यचं त्याच्या कुटुंबीयांनी केक कापून स्वागत केलं.

अजिंक्य रहाणेच्या घराबाहेरही ढोलताशाच्या गजरात चाहत्यांनी स्वागत केलं.

रहाणे कुटुंबाने केक कापून विजयोत्सव साजरा केला. पत्नी राधिका, चिमुरडी आर्याही बाबाच्या यशाने भारावून गेल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापुरी या अजिंक्य रहाणेच्या गावात गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

अजिंक्य रहाणेच्या घरी फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. इतकंच नाही तर पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.