Top 5 Marathi Serial | प्रेक्षकांना भावतेय जयदीप-गौरीची प्रेमकथा, ‘सुख म्हणजे…’सह ‘या’ मालिका ठरल्या अव्वल!
माहिती स्त्रोत : https://www.barcindia.co.in/data-insights#currencydata (महाराष्ट्र-गोवा - ग्रामीण आणि शहरी) आठवडा – 21

या आठवड्यातील (TRP Week 21) टीआरपी शर्यतीच्या यादीत स्टार प्रवाहच्या मालिकांचं वर्चस्व पहायला मिळालं आहे.

जयदीप आणि गौरीची ही गोड प्रेमकथा प्रेक्षकांना खूप भावली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रथम क्रमांकावर आहे.

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या एका मोठ्या निर्णायक वळणावर आली आहे. ही मालिका टीआरपी यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नवऱ्याच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी कीर्ती जीवचं रान करतेय. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका टीआरपी यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्वराजची दृष्टी पुन्हा आल्यानंतर आतातरी वैभवी त्याच्या समोर सत्य आणू शकेल का, या ट्रॅकवर असलेली ‘सांग तू आहे का?’ ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे.

एका सामान्य मुलीचा शिक्षणाचा आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा प्रवास दाखवणारी ‘स्वाभिमान’ ही मालिका टीआरपी शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे.