Captain | भारताला कसोटीत सर्वाधिक विजय मिळवून देणारे टॉप 5 कॅप्टन, ना धोनी ना गांगुली पहिला कोण?

टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अनेक कर्णधारांनी पार पाडली. सुरूवातीला संघ इतका काही मजबूत नव्हता. मात्र आता टीम इंडियाकडे ताकदवान संघ म्हणून पाहिलं जातं. तुम्हाला माहित आहे का? कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या कॅप्टनने सर्वाधिक विजय मिळवून दिलेत. जाणून घ्या.

Harish Malusare | Updated on: Feb 28, 2024 | 6:04 PM
1 / 6
सुनील गावसकर यांनीही नऊ विजय मिळवले आहेत. मात्र नऊ विजयांसाठी त्यांना 47 कसोटी सामने खेळावे लागले. रोहितने त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.  पुढील सामन्यात रोहितने विजय मिळवला तर तो गावसकर यांना मागे टाकू शकतो.

सुनील गावसकर यांनीही नऊ विजय मिळवले आहेत. मात्र नऊ विजयांसाठी त्यांना 47 कसोटी सामने खेळावे लागले. रोहितने त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पुढील सामन्यात रोहितने विजय मिळवला तर तो गावसकर यांना मागे टाकू शकतो.

2 / 6

टीम इंडियाला कर्णधार असताना आपल्या कार्यकालामध्ये सर्वाधिक विजय मिळवून देण्याच्या टॉप 5 मध्ये पाचव्या स्थानी रोहित आणि सुनील गावसकर आहेत. दोघांनीही आपल्या नेतृत्त्वामध्ये नऊ विजय मिळवले आहेत. यामधील रोहित शर्माने अवघ्या 15 सामन्यामध्ये ही कामगिरी केली आहे.

3 / 6

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मह अझरूद्दीन हा चौथ्या क्रमांकावर येतो. अझरूद्दीन याने आपल्या नेतृत्त्वा कसोटी क्रिकेटमध्ये 14 विजय मिळवले होते. यासाठी त्यालाही 47 कसोटी सामने खेळावे लागले होते.

4 / 6

टीम इंडिया माजी कर्णधार आणि दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुली हा तिसऱ्या स्थानावर आहे. दादाने आपल्या नेतृत्त्वात संघाला 21 विजय मिळवून दिले होते. 49 कसोटी सामने खेळले.

5 / 6

दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्र सिंह धोनी याचा नंबर आहे. धोनीने 60 कसोटी सामने खेळले होते. यामध्ये त्याने 27 विजय मिळवले होते.

6 / 6

टीम इंडियाला नेतृत्त्वात सर्वाधिक विजय किंग कोहली याने मिळवून दिले आहेत. विराट कोहलीने 68 सामन्यांमध्ये नेतृत्त्व करताना 40 विजयांची नोंद केली होती. विराट कर्णधार असताना टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा मालिक जिंकत एतिहासिक विजय मिळवला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us