
संध्याकाळी घरात दिवा लावणे ही फक्त एक परंपरा नाही. या दिवा लावण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. घरात दिवा लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते. परंतु दिवा लावताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. दिवा लावताना चूक केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

वास्तूशास्त्रानुसार घरात सूर्यास्तानंतरच दिवा लावायला हवा. जेव्हा सूर्यास्त होतो, तेव्हा आपण काम करून थकून गेलेलो असतो. त्यामुळेच सकारात्मक उर्जा कमी असते. अशा स्थितीत दिवा लावल्यास सकारात्मक उर्जा पुन्हा संचारते. म्हणूनच सूर्यास्तानंतरच दिवा लावावा. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

दिवा लावण्याची जागाही खूप महत्त्वाची असते. मंदिरात किंवा घरात उत्तर-पूर्व दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. ज्या लोकांच्या घरात मंदीर नसते, त्या घरातील लोकांनी घराच्या मुख्य द्वारापाशी दिवा लावावा. असे केल्याने घरात येणारी नकारात्मक उर्जा थांबते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

दिवा लावताना तुम्ही कोणते तुप किंवा तेल लावता यालाही वेगळे महत्त्व आहे. तुपाच्या मदतीने लावलेला दिवा हा वातावरण शुद्ध करतो, असे सांगितले जाते. त्यामुळे घरात शांतता नांदते. दिवा लावताना तो स्वच्छ असावा. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)