
विवाहाचा धार्मिक आधार प्राचीन काळापासून सुरू झाला. देवतांच्या आशीर्वादांशी संबंधित असल्याने ते पवित्र मानले गेले. प्राचीन काळात लग्नासाठी कोणत्या धार्मिक किंवा कायद्याची गरज नव्हती.

पूर्वी लग्न म्हणजे सामाजिक करार होता. भारतात विवाह प्रथा वैदिक काळापासून सुरू झाली. सप्तपदी आणि मंत्रांनी विवाह संपन्न होऊ लागले.

प्राचीन इजिप्त, ग्रीस आणि चीनसारख्या संस्कृतींमध्ये विवाहाचे वेगवेगळे प्रकार आणि प्रथा होत्या. मध्ययुगात लग्नाचं महत्त्व वाढत गेलं.

सुरुवातीला सामाजिक दबावामुळे लग्न व्हायचे. पण आता प्रेमविवाह देखील होऊ लागले आहेत. आज लग्न फक्त एक परंपरा नाही तर, वैयक्तिक आवड देखील आहे.

सुरुवातीच्या काळाच विवाहाचा मुख्य उद्देश वंश वाढवणे आणि सामाजिक व्यवस्था राखणे हा होता. आज लग्न करताना जोडीदार निवडण्यासाठी मुलीचं मत देखील महत्त्वाचं आहे.