GK : रेल्वे रुळाचे लोखंड कधीच चोरीला का जात नाही, चोर का घाबरतात; 99 टक्के लोकांना खरं कारण माहितीच नाही!

भारतात सगळीकडे रेल्वे रुळ आहेत. रेल्वेचे सामानही इकडे-तिकडे पडलेले असते. परंतु रेल्वेचे सामान का चोरीला जात नाही, असे विचारले जाते.

| Updated on: Jan 21, 2026 | 11:55 PM
1 / 5
भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत तुम्हाला रेल्वेचे रुळ पसरलेले दिसतात. भारतात रेल्वे आणि रेल्वे विभाग एवढा मोठा आहे की काही वर्षांपूर्वी भारत सरकार रेल्वे विभागाचा अर्थसंकल्प वेगळा मांडायचे.

भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत तुम्हाला रेल्वेचे रुळ पसरलेले दिसतात. भारतात रेल्वे आणि रेल्वे विभाग एवढा मोठा आहे की काही वर्षांपूर्वी भारत सरकार रेल्वे विभागाचा अर्थसंकल्प वेगळा मांडायचे.

2 / 5

भारतीय रेल्वे विभागाच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जागा, कोट्यवधी रुपयांचे सामान आहे. परंतु रेल्वेचे कोणतेही सामान कधीच चोरीला जात नाही. तुम्ही देशातल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावर जा, तुम्हाला रेल्वे विभागाशी संबंधित बरेचसे सामान इकडे-तिकडे पडलेले दिसते.

3 / 5

विशेष म्हणजे जिथे निर्मणूष्य जागा असते, तिथेही तुम्हाला लोखंडी रेल्वे रुळाचे काही सुटे भाग पडलेले दिसतात. काही-काही ठिकाणी तर रेल्वेच्या मालकीचे लोखंड कित्येक वर्षे पडून असते. परंतु तरीदेखील रेल्वे विभागाच्या मालकीचे हे लोखंड, रेल्वे रुळ तसेच इतर सामान चोरीला जात नाही. असी चोरी करण्याचे कोणी धाडसही करत नाही. यामागे विशेष कारण आहे.

4 / 5

पहिले कारण म्हणजे रेल्वे विभागाच्या प्रत्येक लोखंडावर विशेष आकडे असतात. सांकेतिक क्रमांक आणि चिन्ह असते. हे संकेत सामान्य माणसाला समजत नाहीत. त्यामुळे रेल्वे विभाच्या मालकीचा रेल्वे रुळ किंवा इतर काही सामान चोरीला गेले की ते लगेच पकडले जाते.

5 / 5

सोबतच रेल्वे विभागाच्या कोणत्याही सामानाची चोरी केल्यास आणि ती पकडली गेल्यास कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. रेल्व पोलीस किंवा रेल्वे प्रशासनाच्या हे लक्षात आले तर कायद्यानुसार कारवाई केली जाते. या कारवाईत दोषी ठरल्यास कित्येक वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्यामुळेच रेल्वेचे कोणतेही सामान शक्यतो चोरीला जात नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us