
प्रत्येकालाच महागड्या हेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करावं वाटतं. काही-काही खवय्यै तर हमखास महागातल्या महाग रेस्टॉरंटमध्ये जेवून येतात. अशा रेस्टॉरंट्समधील जेवणाचे बिल कित्येक हजार रुपये होते. तरीदेखील लोकांची त्या रेस्टॉरंटमधील गर्दी कमी होताना दिसत नाही.

परंतु अशा महागड्या रेस्टॉरंट्समध्ये जेवणाच्या प्लेटमध्ये अन्न खूपच कमी असते. यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे अशा महागड्या रेस्टॉरंट्समध्ये एखाद्या पदार्थाला पूर्ण आस्वाद घेऊन खावे, असे अपेक्षित असते.

त्यामुळेच ग्राहकाे प्रत्येक पदार्थाची चव चाखावी, ध्यानपूर्वक खावे म्हणूनच प्लेटमध्ये कमी अन्नपदार्थ ठेवलेले असतात. महागड्या रेस्टॉरंट्समध्ये एका वेळी एकच डिश समोर ठेवली जाते.

अशा महागड्या रेस्टॉरंटमध्ये एका वेळी सात ते आठ चविष्ट खाद्यपदार्थ दिले जातात. या सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा म्हणूनच महागड्या रेस्टॉरंट्समध्ये प्लेटवर कमी जेवण ठेवलेलं असतं.

जेवणाची क्वांटिटी कमी असल्याने तेथील शेफ प्रत्येक खाद्यपदार्थ तन्मयतेने, मन लावून तयार करतो. जेवणाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये म्हणूनही मोजकेच जेवण तयार केल जाते आणि तेच अन्नपदार्थ पुढे ग्राहकांना खायला दिले जातात.