shakambhari navratri 2022 | आस्था, श्रद्धेचा शाकंभरी नवरात्र उत्सव, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जल्लोषात जागर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला जलदिंडी हा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 14, 2022 | 10:38 AM
1 / 6
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला जलदिंडी हा धार्मिक कार्यक्रम पार पडला .

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला जलदिंडी हा धार्मिक कार्यक्रम पार पडला .

2 / 6

शाकंभरी देवीची मूर्ती फळ भाज्या व फुलांचा वापर करून बनवण्यात अली होती . पावसाळ्यानंतर पिकणारी सर्व फळे व भाज्या वापरून देवीची हि आकर्षक मूर्ती तयार करण्यात अली होती यांनतर या भाज्यांपासून बनवलेला महाप्रसाद भक्तांना देण्यात आला .

3 / 6

देवीची मूर्ती बनवतांना कांदा , कोबी , पालक , मेथी , संत्री , डाळिंब , लिंबू , मिरची , लसूण आदींसह अननस केळी आदीचा वापर करण्यात आला होता.

4 / 6

तुळजापूर शहरातील शेकडो महिलांनी पापनाश तीर्थातील जल घागरीत भरून ती घागर डोक्यावर घेऊन तुळजाभवानी चरणी अर्पण करीत मंदिर परिसर स्वच्छ केला . देवीच्या कृपेने निसर्गात भरपूर धनधान्य पिकल्याने त्याचा नैवैय देवीला अर्पण करण्यात आला.

5 / 6

शाकंभरी नवरात्रीच्या पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. पौष पौर्णिमेच्या नावाने हा दिवस देशभरात विविध ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक पवित्र नदीवर जाऊन स्नान करतात. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते असे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी मातेची पूजा आणि नियम पाळल्यास व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

6 / 6

नवीन नियमावलीमुळे तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे. भाविक कमी होत असल्याने तुळजापूर येथे भाविकांची गर्दी कमी झाली आहे, भाविक कोरोना नियम कडक केल्याने व संसर्ग वाढल्याने येत नाहीत त्यामुळे पूजेच्या सामानाची विक्री कमी झाली आहे परिणामी तुळजापूर येथील अर्थकारण बिघडले आहे. | प्रतिनिधी संतोष जाधव

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us