
धनू राशीच्या लोकांना त्यांच्या गुंतागुंतीच्या विचारांमुळे संघर्षाचा सामना करावा लागतो.या लोकांचे एकाच गोष्टीबद्दल त्यांचे दोन मत असतात. ज्यामुळे ते स्वतःच त्यांच्या आयुष्यात संघर्ष निर्माण करतात.जर या राशीच्या लोकांनी एकाग्र मन करण्याचा प्रयत्न केला तर ते आयुष्यात प्रत्येक वेळी यश प्राप्त करतील.

मकर राशीच्या लोकांमध्ये आळशीपणा त्यांच्यावर अधिराज्य गाजवतो.ते आजचे काम उद्यावर ढकलण्यात पटाईत असतात.यामुळेच त्यांना जीवनात आव्हानांचा सामना करावा लागतो. जेव्हा ते त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आळशीवृत्तीचा त्याग करतील तेव्हाच त्यांच्या जीवनातील संघर्ष नाहीसा होईल.

या राशीच्या लोक प्रमाणापेक्षा जास्त विचार करतात. त्यांचा हा स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणते. ते नेहमीच कोणत्या कोणत्या अडचणीत असतात. या लोकांमध्ये दुसऱ्याचा मत्सर करण्याची वृत्ती दिसून येते. त्यामुळे त्यांना जीवनाच्या विविध क्षेत्रांत संघर्षांला सामोरे जावे लागते.

या राशीचे लोकं अतिशय आकर्षक आणि चांगल्या स्वभावाचे मानले जातात. तसेच, त्यांनाही जीवनात बऱ्याच संघर्षातून जावे लागते. याचे मुख्य कारण त्यांचे वाढते मित्र मंडळ असू शकते. तसेच या लोकांना देखावा करायला आवडतो. ज्या वयात काम केले पाहिजे त्या वयात ही माणसे या मैत्रीच्या वर्तुळात अडकून अनमोल वेळ वाया घालवताना दिसतात. वेळेचा अनादर केल्यामुळे त्यांना आयुष्यातील संघर्षांना तोंड द्यावे लागते. योग्य वेळी आपल्या सवयी बदला पण खूप मेहनत घेऊन हे लोक आयुष्यात यशस्वी होतात.