Ambadas Danve : ‘गनिमी कावा कसला, ही तर गद्दारीच!’ अंबादास दानवे यांनी सांगितला इतिहास, केला पलटवार..

| Updated on: Dec 01, 2022 | 9:02 PM

Ambadas Danve : सध्या राज्यात उपाध्या आणि तुलनेचा हाऊसफूल शो सुरु असताना, दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे..

Ambadas Danve : गनिमी कावा कसला, ही तर गद्दारीच! अंबादास दानवे यांनी सांगितला इतिहास, केला पलटवार..
ही गद्दारीच
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

औरंगाबाद : राज्यात शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) दररोज शाब्दिक धुमचक्री सुरु आहे. शिंदे गटातील आमदार, भाजपचे नेते दररोज आपल्या वक्तव्यांनी नवीन वाद ओढावून घेत आहेत. तर विरोधकही हल्लाबोल करायला चूकत नसल्याचे चित्र आहे. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गनिमी कावा केल्याचा युक्तीवाद करण्यात येत आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सडकून टीका केली आहे. ‘गनिमी कावा कसला, ही तर गद्दारीच!’, असल्याचा पलटवार दानवे यांनी केला आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची तूलना करण्याची राज्यात जणू एक स्पर्धाच लागली आहे. दररोज एक मंत्री अथवा आमदार त्यांच्या बंडाचे मूल्यमापन महाराजांच्या इतिहासाशी करु पाहत आहे. त्यावरुन राज्यात वादंग पेटले आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी गिनमी कावा हा शत्रूंविरोधात केला होता. तो स्वकीयांविरोधात केला नाही. स्वराज्यावर चालून आलेल्यांविरोधात महाराजांनी गनिमी कावा केला, महाराजांनी स्वकीयांविरोधात गनिमी कावा केला नसल्याचे दानवे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

शिंदे गट जो गनिमी काव्याचा दावा करत आहे, तो त्यांनी कोणाविरुद्ध केला तर ज्यांनी त्यांना मोठं केलं. नगरसेवकांपासून मंत्री केलं, त्यांच्याविरुद्ध ते दावा करत आहे, पण हा तर गनिमी कावा ठरत नाही, ही गद्दारी ठरत असल्याचा पलटवार दानवे यांनी शिंदे गटावर केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जाणीवपूर्वक तुलना, अवमान करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. अशा प्रवृत्तीचा निषेध करायला हवा. हा प्रकार  राज्यात मुद्दामहून घडवून आणण्यात येत असल्याचे ते म्हणाले.  याविरोधात त्वेषाने सरकारमधील नेते बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यावर भाजपने राज्यात आंदोलन केले. पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य होत असताना भाजप शांत असल्याचा आरोप त्यांनी केला.