तर शिंदे- फडणवीस सरकार बरखास्त करा; अंबादास दानवे यांची मागणी

| Updated on: Sep 12, 2022 | 5:38 PM

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री भेटत असतील आणि मुंबई व महाराष्ट्रात फिरायचं आहे ना? अशा धमक्या देत असतील तर राज्यातील हे सरकार गुंडांचं सरकार आहे का?

तर शिंदे- फडणवीस सरकार बरखास्त करा; अंबादास दानवे यांची मागणी
प्रकल्प गुजरातलाच का हलवला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: केंद्रातील मंत्री नारायण राणे (narayan rane) हे थेट दादागिरी करत धमकी देत आहेत. शिंदे-फडणवीस (shinde government) यांचं सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालून दादागिरी करत उघडपणे धमक्या देत फिरत असेल तर असे दादागिरी करणारे सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी आमची आणि सामान्य जनतेची मागणी असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री भेटत असतील आणि मुंबई व महाराष्ट्रात फिरायचं आहे ना? अशा धमक्या देत असतील तर राज्यातील हे सरकार गुंडांचं सरकार आहे का? असा सवाल करत दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई व महाराष्ट्र शिंदे भाजप यांना आंदण म्हणून दिल आहे का? असा सवाल दानवे यांनी केला आहे. गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, ते जर राज्यात कायदा व सुव्यस्था राखू शकत नसतील आणि अशाप्रकारे गुंडगिरी व दादागिरी होत असेल तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचंही ते म्हणाले.