भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रवादीवर आरोप करत उद्धव ठाकरेंना डिवचले

| Updated on: Sep 19, 2022 | 9:51 PM

एकनाथ शिंदेच्या बंडखोरीचा फायदा भाजपला झाल आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जबरस्दत झटका बसला आहे.

भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रवादीवर आरोप करत उद्धव ठाकरेंना डिवचले
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर नवे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलेय. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पहिल्याच निवडणुका पार पडला. ग्राम पंचायत निवडणुकीत(Gram Panchayat election results) भाजपने पहिले स्थान मिळवले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडखोरीचा फायदा भाजपला झाल आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जबरस्दत झटका बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयामुले भाजप नेत्यांचा आत्मविश्वासही प्रचंड वाढला आहे. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेले शिल्लक सेना असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर होती. आता शिवसेना फुटीनंतर, उद्धव ठाकरेंना गावागावातही धक्का बसला आहे.

शिवसेना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना पाचव्या क्रमांकावर केलीय. त्यावरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.

पक्ष सांभाळला गेला पाहिजे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पक्षाची काय वाताहत होते हे आजच्या निकालावरून पाहायला मिळत आहे असा टोला गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

तर, भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा घाट घातल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे.