….मग पाणी काय आकाशातून टाकू का? मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

पाणी टंचाईबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील भलतचं काही तरी बोलून बसलेत.

....मग पाणी काय आकाशातून टाकू का? मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
vanita kamble | Updated on: Oct 19, 2022 | 7:12 PM

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील(Minister Gulabrao Patil) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेमहीच चर्चेत असतात. आता मात्र, गुलाबराव पाटील त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पाणी टंचाईच्या समस्येवर उत्तर देताना गुलाबराव पाटील भलतचं काही तरी बोलून बसले आहेत. पाणी टंचाईची समस्या मांडणाऱ्या नागरीकांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

धरणगाव एरंडोल तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्यानं लोकांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. नदीला आलेल्या पुरामुळे पंप बंद बडलेत. यामुळे पंपामध्ये गाळ जमा झाला आहे.

पुरामुळे ही तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर पंपच बंद आहेत मग पाणी काय आकाशातून टाकू का? असं वादग्रस्त वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केले आहे.

मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं आहे असं वक्तव्य गुलाबराब पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

राज्यात अनेक पाणी पुरवठा योजना आणणार असं गुलाबराब पाटील यांनी म्हंटले होते. खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्या जातील असे गुलाबराव पाटील यांन म्हंटले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us