आम्ही फोडाफोडी केली तर भाजप रिकामं होईल, अनेक आमदार स्वगृही परततील : नवाब मलिक

| Updated on: Nov 30, 2019 | 11:49 AM

चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे, तसं असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल, असं नवाब मलिक म्हणाले.

आम्ही फोडाफोडी केली तर भाजप रिकामं होईल, अनेक आमदार स्वगृही परततील : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : ठाकरे सरकारच्या शपथविधीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. महापुरुषांबद्दल आम्हालाही आदर आहे, मात्र शपथविधी हा शपथविधी असतो, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक (Nawab Malik on Chandrakant Patil)  यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे, तसं असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल, असं नवाब मलिक म्हणाले.

“भाजप दावा करत होता की 119 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांचे स्वतःचे 105 आणि 14 अपक्ष. मात्र आज तशी परिस्थिती नाही. अनेक आमदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे येऊ इच्छितात. पण आम्हाला फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही. आमचं भाजपला आव्हान आहे की त्यांनी मतविभाजन मागावं.जी भाजपनं प्रथा सुरू केली आहे, ती पहिल्यांदा त्यांनी दुरूस्त करावी”, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपनं आमचे आव्हान स्वीकारावं, त्यांनी 119 आमदार कुठं आहेत ते दाखवा. भाजपमधील आमदार चलबिचल झाले आहेत. तेथील काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फोडाफोडीचे राजकारण केले तर भाजप रिकामं होईल, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. भाजप शपथेवर आक्षेप घेत आहे, परंतु तसं झालं तर संसद रिकामी करावी लागेल, असं नवाब मलिक म्हणाले. (Nawab Malik on Chandrakant Patil)


संबंधित बातम्या  

ठाकरेंचा शपथविधी बेकायदेशीर, भाजप सुप्रीम कोर्टात जाणार