राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार; जयंत पाटलांचं मोठं विधान

| Updated on: Sep 22, 2022 | 6:29 PM

पत्राचळ प्रकरणी शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुबंईचा पालकमंत्री होतो मलाही पत्राचाळीतील लोक भेटायला आले होते. भाजपला नैराश्य आले आहे, त्यामुळेच आरोप आणि टीका सुरू आहे, असं ते म्हणाले.

राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार; जयंत पाटलांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चंदन पूजाधिकारी, नाशिक: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपवर (bjp) जोरदार निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालय 40 आमदारांना कधीही बरखास्त करू शकतात. सर्व 40 आमदारांना मंत्री व्हायचे आहे. हे 40 जण किती त्रास देत असतील. पण माझी सहानुभूती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासोबत आहे, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला. भाजपच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आल्याने भाजपचे 106 आमदारही नाराज आहेत. सरकार अस्थिर असल्याचं प्रशासनालाही समजून चुकलं आहे. त्यामुळे अधिकारीही ऐकत नाहीत. काही आमदार तर खासगीत कुठून अवदसा आठवली अन् यांच्या नादाला लागलो असं सांगतात, असा दावाही त्यांनी केला.

जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवसेनेवर बोलण्यासारखे काही नसल्यानं शरद पवार आणि राष्ट्रवादीला दोष देत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्याच कारण नाही. दुसरा गट बीकेसीला गेला. त्यामुळे शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्याची गरजच नव्हती. पोलीस आणि मनपाकडे सबळ कारण नाही. त्यांनी परवानगी दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पत्राचळ प्रकरणी शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुबंईचा पालकमंत्री होतो मलाही पत्राचाळीतील लोक भेटायला आले होते. भाजपला नैराश्य आले आहे, त्यामुळेच आरोप आणि टीका सुरू आहे, असं ते म्हणाले.

फडणवीस यांना संपविण्याचा प्रयत्न कधी केला नाही. अशी कुठली कृती केली असेल ती आम्हाला संगावी. आम्ही त्यांचा सन्मान केला. त्यांना असे का वाटते माहीत नाही. निवांत भेटले को विचारेल, असा चिमटाही त्यांनी काढला.