राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव

| Updated on: May 23, 2019 | 9:28 PM

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा […]

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव
Follow us on

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलाय. त्यांनी यावेळी जवळपास साडे चार लाखांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली. तर जळगावचे भाजप उमेदवार उन्मेश पाटील यांनीही 4 लाख 10 हजाराच्या फरकाने विजय मिळवला.

शिवसेना आणि भाजपने अनुक्रमे 23 आणि 25 जागांवर उमेदवार उतरवले होते. भाजपने सर्वाधिक यश मिळवत 23 उमेदवार विजयी झाले आहेत. तर फक्त दोन उमेदवारांचा पराभव झाला. बारामतीमधून कांचन कुल आणि चंद्रपुरातून हंसराज अहिर यांचा पराभवाचा सामना करावा लागला. बारामतीत भाजपने अगोदरपासूनच विजयाचा दावा केला होता, पण सुप्रिया सुळेंनी एकतर्फी विजय मिळवला.

केंद्रीय मंत्र्याचा पराभव

केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहिर यांचा काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी पराभव केला. काँग्रेसला राज्यात चंद्रपूरची एकमेव जागा जिंकता आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत सर्वांचा पराभव झालाय. त्यात चंद्रपूरमध्ये आश्चर्यकारक विजय मिळाला, ज्यात केंद्रीय मंत्र्यांचाच पराभव झाला.

बारामतीत एकतर्फी लढत

2014 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सुप्रिया सुळेंची दमछाक केली होती. पण यावेळी सुप्रिया सुळेंनी सहज विजय मिळवला. भाजपने बारामतीत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मोठं आव्हान निर्माण करण्यात यश आलं असलं तरी सुप्रिया सुळेंनी बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवलंय.