Eknath Shinde : शिंदे मला मुलासारखं बघतात, ते उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच उपमुख्यमंत्री, शहाजी बापूंनी सांगितला सत्तेचा प्लॅन

| Updated on: Jun 24, 2022 | 11:53 AM

सध्याचे सत्तापालट काही का असेना पण आता आमदारही आपआपल्या मतदार संघाचा विचार करु लागले आहेत. यामधून एक चांगल घडलं म्हणजे सांगोला मतदार संघाचा कायापालट करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. मंत्रिपदात आपल्याला रस नाही पण विकासकामे खेचून आणणारच.

Eknath Shinde : शिंदे मला मुलासारखं बघतात, ते उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच उपमुख्यमंत्री, शहाजी बापूंनी सांगितला सत्तेचा प्लॅन
आ. शहाजी बापू पाटील
Follow us on

मुंबई : सत्ता स्थापनेपूर्वीच आता (Constituency) मतदारसंघाच्या विकासाचे प्लॅनिंग ते हे गुवाहटीमध्ये ठरत आहे. म्हणजे (Politics) राजकारण कुठल्या स्टेपला गेले आहे याची सर्वसामान्य नागरिकांना कल्पनाही येणार नाही. मात्र, बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व किती एकमुखाने मान्य केलंय हे देखील (MLA Shahaji Patil) शहाजी बापू पाटलांच्या एका ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे. आता उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हेच असणार असेच या क्लिपमधून समोर येत आहे. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आपणच उपमुख्यमंत्री आहोत असे आ. शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला सांगितले आहे. एवढेच नाहीतर विकास कामात कुणाचा अडसर ठरणार नाही. येत्या काळात सांगोला मतदार संघाचा कायापालट होणारच असा विश्वासही त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिला आहे.

नेमका काय आहे संवाद?

आता एवढ्या दिवसांपासून सत्ताकारणाची गणिते गुवाहटीमध्ये जुळवली जात असल्याने कार्यकर्त्यानेही उत्सुकतेपोटी आ. शहाजी बापू पाटलांना विचारलं की, मतदार संघात सर्वकाही ठीक आहे पण कधी घडणार..कधी पर्यंत घडणार हे सर्व त्यावर शहाजी बापू पाटील म्हणाले :- आता साहेब (एकनाथ शिंदे) निर्णय घेणार. साहेबांच्या मनावर. पण एक सांगतो सरकार शंभर टक्के झालं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री. एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री. मंत्रीपदाची चांगली संख्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार. आपल्याला काय दिलं दिलं नाय दिलं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आपणच उपमुख्यमंत्री आहेत वो…. आता फडणवीस साहेब आणि माझं नातं तुम्हाला माहीत हाय. भावा-भावा सारखं नातं आहे. शिंदे साहेब मला मुलासारखं बघतोय. मुलाच्या नजरेनं बघतंय. लय प्रेमळ नजर त्या माणसाची माझ्यावर हाय हो.

हे सुद्धा वाचा

मतदार संघाचा कायापालट होणारच

सध्याचे सत्तापालट काही का असेना पण आता आमदारही आपआपल्या मतदार संघाचा विचार करु लागले आहेत. यामधून एक चांगल घडलं म्हणजे सांगोला मतदार संघाचा कायापालट करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. मंत्रिपदात आपल्याला रस नाही पण विकासकामे खेचून आणणारच.शिवाय विकास कामाच्या जोरावर पुन्हा मंत्रिपदासाठी भांडूच की असे म्हणत आ. शहाजी बापू पाटलांनी आगामी 25 वर्षाचे राजकारणही स्पष्ट केले. मंत्रिपद काय केव्हाही मागता येईल कारण हे काय 25 वर्ष सत्तेपासून दूर जात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कशी झाली बंडाला सुरवात?

बंडाची सुरवात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाली असली तरी सुरतेला पहिले पाऊल लागले ते आ. शंभूराजे देसाई आणि शहाजी बापू पाटील यांचे. त्यामुळे सुरतेची लढाई ही जिंकल्यात जमा आहे. दिवसेंदिवस नाराज आमदारांची संख्या वाढत आहे. आमदारांच्या मनातील खदखद आता स्पष्टपणे बाहेर येत आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आता सर्वच आमदारांनी मान्य केले आहे. त्यामुळे सुरतेची लढाई जिंकली असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला सांगितले आहे.