Kojagiri Purnima : इतक्या वर्षानंतर लागतेय कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण, हे नियम अवश्य पाळा

28 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:05 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि 02:24 वाजता समाप्त होईल. सुतक दुपारी 4 च्या सुमारास सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालू राहील. सुतक काळापासून चंद्रग्रहण होईपर्यंत कोणतेही शुभ कार्य निषिद्ध मानले जाते. वास्तविक, असे मानले जाते की ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व सुरू होते. अशा स्थितीत या काळात देवाचे ध्यान करावे.

Kojagiri Purnima : इतक्या वर्षानंतर लागतेय कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण, हे नियम अवश्य पाळा
चंद्र ग्रहण
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 25, 2023 | 11:25 AM

मुंबई : धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याचा लोकांच्या जीवनावर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला म्हणजेच शरद पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. तज्ज्ञांच्या मते असा योगायोग 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होताना घडला आहे. चंद्रग्रहणाचे सुतक 9 तास अगोदर सुरू होते. 28 ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. अशा स्थितीत येथे सुतक कालावधीही वैध असेल.

28 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:05 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि 02:24 वाजता समाप्त होईल. सुतक दुपारी 4 च्या सुमारास सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालू राहील. सुतक काळापासून चंद्रग्रहण होईपर्यंत कोणतेही शुभ कार्य निषिद्ध मानले जाते. वास्तविक, असे मानले जाते की ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व सुरू होते. अशा स्थितीत या काळात देवाचे ध्यान करावे.

या लोकांनी विशेष काळजी घ्यावी

गर्भवती महिलांना चंद्रग्रहणाच्या काळात विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते कारण ग्रहणाचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी त्यांच्यासाठी काही नियम देण्यात आले आहेत. ते नियम काय आहेत ते जाणून घेऊया

  • या काळात गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेर पडू नये.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी देवाचे ध्यान करा आणि मंत्रांचा जप करा. पण मंदिरात जाऊ नका.
  • चंद्रग्रहण काळात तुळशीची पाने शिजवलेल्या अन्नात, दूध आणि दही यांसारख्या पदार्थांमध्ये घालावीत. या काळात तुळशीच्या
  • शिळे अन्न खाणे टाळावे.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा. असे मानले जाते की हे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून आई आणि बाळ दोघांचे संरक्षण करते. नंतर नदीत नारळ विसर्जित करा.
  • या काळात गरोदर महिलांनी चुकूनही तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)