या लोकांनी नेहमी अंत्यसंस्कारांपासून दूर राहिले पाहिजे; स्मशानात तर चुकूनही जाऊ नये, कारण जाणून घ्या…

हिंदू धर्मात अंत्यसंस्काराला फार महत्त्व असते. व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यसंस्काराची विधी केली जाते. त्यामागे बरेच कारण सांगण्यात आलं आहे. पण काही व्यक्तींनी अंत्यसंस्कारात किंवा स्मशानात जाण्यास मनाई केली जाते. त्या ठराविक व्यक्तींनी चुकूनही स्मशानात जाऊ नये असे म्हटले जाते. त्या मागे नेमकी काय कारणे आहेत जाणून घेऊयात.

या लोकांनी नेहमी अंत्यसंस्कारांपासून दूर राहिले पाहिजे; स्मशानात तर चुकूनही जाऊ नये, कारण जाणून घ्या...
Certain people should always stay away from funerals; they should not even go to the cemetery.
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 29, 2025 | 3:21 PM

हिंदू धर्मात एकूण 16 विधींचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी एक म्हणजे अंतिम संस्कार, जे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केले जातात. या विधीमध्ये, मृत व्यक्तीचे शरीराला अग्नी दिला जातो. तसेच विविध धार्मिक परंपरा आणि नियमांचे पालन केले जाते. शास्त्रात अंतिम संस्कारांच्या विधींना फार महत्त्व असतं. त्या प्रत्येक विधींमागे काहीना काही अर्थ आहेत. पण हे फार कमी जणांना माहित असेल की हिंदू शास्त्राच्या मान्यतेनुसार काही लोकांना स्मशानात प्रवेश करणे निषिद्ध मानले जाते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की काही ठराविक व्यक्तींनी अंत्यसंस्कारांना उपस्थित राहू नये. कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी आणि मानसिक स्थितीसाठी अयोग्य मानले जाते. अंत्यसंस्कारांना कोणत्या लोकांनी उपस्थित राहू नये आणि यामागे कोणती धार्मिक कारणे दिली आहेत ते जाणून घेऊया.

या लोकांनी चुकूनही स्मशानात जाऊ नये

लहान मुले

लहान मुलांना अंत्यसंस्कार किंवा स्मशानभूमीत उपस्थित राहण्यास मनाई आहे. असे मानले जाते की मुलांना या प्रक्रियेपासून दूर ठेवले पाहिजे कारण ते मानसिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असतात. अंत्यसंस्काराचे वातावरण, गर्दी आणि अंत्यसंस्कार प्रक्रिया यांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे भीती, असुरक्षितता किंवा मानसिक ताण येण्याची शक्यता वाढते. म्हणून, शास्त्रानुसार, लहान मुलांना अंत्यसंस्कारात सहभागी करून घेऊ नये.

एखादा व्यक्ती सुतक काळातून जात असेल तर 

एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात अलीकडेच कोणाचा मृत्यू झाला असेल आणि तो व्यक्ती सुतक काळातून जात असेल तर त्या व्यक्तीने देखील इतर कोणाच्याही अंत्यसंस्काराला उपस्थित राहू नये. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की सुतक काळात असलेल्या व्यक्तीचे मन त्या परिस्थितीत अशांत असते. असे मानले जाते की यामुळे दोन्ही आत्म्यांच्या शांतीला बाधा येऊ शकते. म्हणून, या काळात स्मशानभूमीला जाणे टाळावे.

आजारी व्यक्ती

आजारी किंवा शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांनी अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणे टाळावे. असे मानले जाते की स्मशानभूमीतील वातावरण, धूर आणि गर्दी त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. जर एखादी व्यक्ती मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या निरोगी नसेल तर अंत्यसंस्काराला उपस्थित राहणे हानिकारक ठरू शकते.

गर्भवती महिला

गर्भवती महिलांना स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्कारात जाण्यास मनाई केली गेली आहे. असे मानले जाते की अशा ठिकाणी असलेले नकारात्मक ऊर्जा, तेव्हाची तणावपूर्ण परिस्थिती आणि वातावरण विकसनशील बाळावर परिणाम करू शकते. या कारणास्तव, परंपरा गर्भवती महिलांना अंत्यसंस्कारांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

 

Follow Us