Chanakya Niti | ‘या’ सात गोष्टी खाल्ल्यानंतरही तुम्ही पूजा-अर्चना करु शकता

| Updated on: Mar 16, 2021 | 12:46 PM

साफ-सफाई आणि पवित्रतेबाबत चाणक्य यांनी आपल्या 'निती शास्त्रा'त अनेक (People Can Eat These 7 Things) नितींचं वर्णन केलं आहे.

Chanakya Niti | या सात गोष्टी खाल्ल्यानंतरही तुम्ही पूजा-अर्चना करु शकता
chanakya niti
Follow us on

मुंबई : साफ-सफाई आणि पवित्रतेबाबत चाणक्य यांनी आपल्या ‘निती शास्त्रा’त अनेक (People Can Eat These 7 Things) नितींचं वर्णन केलं आहे. चाणक्य सांगतात की मनुष्य सात गोष्टी खाल्ल्यानंतर पूजा-अर्चना करु शकता. चाणक्य यांनी सात वस्तूंना पवित्र सांगितलं आहे. चला जाणून घेऊ या कुठल्या सात गोष्टी आहेत त्याबाबत (Chanakya Niti People Can Eat These 7 Things Before Doing Religious Things) –

इक्षुरापः पयो मूलं ताम्बूलं फलमौषधम् ।
भक्षयित्वापि कर्तव्या: स्नान दानादिका: क्रिया: ।।

रुग्ण आणि क्षुधा-पीडितांसाठी या श्लोकात चाकाण्य यांनी शास्त्र-सम्मत कथनचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की शास्त्रात जल, ऊस, दूध, कंद, पान, फळं आणि औषधी हे अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे याचं सेवन केल्यानंतरही व्यक्ती धार्मिक कार्य संपन्न करु शकतात. यामुळे कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होत नाही (Chanakya Niti People Can Eat These 7 Things Before Doing Religious Things).

सामान्य भारतीयांमध्ये ही धारणा आहे की स्नान आणि ध्यान इत्यादी केल्यानंतरच फळ आणि औषधी इत्यादींचं सेवन करायला हवं. पण, चाणक्य सांगतात की प्रकृती अस्वस्थतेमुळे किंवा कुठल्याही इतर अवस्थेत दूध, जल, कंदमुळं, फळं आणि औषधं इत्यादींचं सेवन करु शकता. यामध्ये कुठलंही पाप लागत नाही. त्यानंतर स्नान करुन पूजा-पाठ आणि धार्मिक कार्य करणे अनुचित नाही, असं चाणक्य सांगतात.

Chanakya Niti People Can Eat These 7 Things Before Doing Religious Things

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : कितीही संकट आलं तरी ‘या’ 3 गोष्टी विसरू नका, मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम होतील दूर

Chanakya Niti : आयुष्यात पैसा टिकवायचा असेल तर ही आहे चाणक्य नीति, लक्ष्मी कधीही होणार नाही नाराज