धन समृद्धीसाठी कासवाची अंगठी घालताय? चूक झाली तर होऊ शकते नुकसान, त्याआधी वाचा वास्तू नियम

कासवाची अंगठी घातल्याने जीवनात स्थिरता, आनंद, समृद्धी आणि शांती येते. वैवाहिक जीवन सुखी होते. लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो आणि चंद्र व शुक्र ग्रहांचे बळ वाढते. चला तर कासवाची अंगठी घालण्याचे योग्य वास्तू नियम जाणून घेऊयात.

धन समृद्धीसाठी कासवाची अंगठी घालताय? चूक झाली तर होऊ शकते नुकसान, त्याआधी वाचा वास्तू नियम
turtle ring
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2026 | 10:36 PM

हिंदू धर्मात कासवाला धार्मिक महत्त्व आहे. कारण भगवान विष्णूने त्यांच्या कच्छप अवतारात समुद्रमंथनासाठी एक भक्कम पाया पुरवला, ज्यामुळे मंदार पर्वत स्थिर झाला. तर दुसरीकडे वास्तुनूसार आपल्यापैकी अनेकजण स्थिरता, संयम, संपत्ती, आनंद आणि समृद्धी मिळवण्यासाठी कासवाची अंगठी घालतात. ज्योतिषशास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्याने धन आकर्षित होते. कासवाची अंगठी घालण्याचे काही विशिष्ट नियम आहेत. ज्यांचे पालन केल्यास त्याचे फायदे मिळू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण या वास्तू नियमाबद्दल जाणून घेऊयात.

कासवाची अंगठी घालण्याचे नियम

ज्या लोकांचे जीवन अशांत आहे, आर्थिक परिस्थिती वाईट आहे, स्थिरता नाही, मन एकाग्र होत नाही, अशा लोकांनी कासवाची अंगठी घालावी.

कासवाची अंगठी सहसा चांदीची बनवलेली असते. याव्यतिरिक्त तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार ती पाच किंवा आठ धातूंपासूनही बनवली जाऊ शकते.

कासवाची अंगठी तुमच्या उजव्या हाताच्या तर्जनी किंवा मधल्या बोटात घालावी.

तर्जनी ही देवांचा गुरू असलेल्या गुरू ग्रहाशी संबंधित आहे आणि मधले बोट शनी ग्रहाशी संबंधित आहे. शनी कृतीचे तर गुरू ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो.

जेव्हा तुम्ही कासवाची अंगठी घालता, तेव्हा कासवाचा चेहरा तुमच्याकडे असावा. जेव्हा त्याचा चेहरा तुमच्याकडे असतो, तेव्हा धन, आनंद, समृद्धी, प्रगती आणि शुभता तुमच्याकडे प्रवाहित होतात. जर चेहरा विरुद्ध दिशेला असेल, तर या सर्व गोष्टी कमी होतात.

चांदीची कासवाची अंगठी घातल्याने चंद्र आणि शुक्राचे दुष्परिणाम कमी होतात. यामुळे त्यांची शुभता वाढते, ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि शांती येते. तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.

शुक्रवारी कासवाची अंगठी घालणे खूप फायदेशीर ठरेल. सोमवारचा दिवसही शुभ असेल. जर शुक्रवारी पौर्णिमा असेल, तर तो सर्वोत्तम दिवस असेल.

एकदा कासवाची अंगठी तयार झाली की, ती लगेच घालू नका. प्रथम ती गंगाजलाने ती पूर्णपणे धुवा. त्यानंतर ती लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू यांच्या चरणांवर ठेवा. त्यानंतर पूजा करा धूप आणि दिवा लावा. ‘ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः’ आणि ‘ॐ विष्णुवे नमः’ या मंत्रांचा जप करा. मग ती बोटामध्ये धारण करा.

ही अंगठी घातल्यानंतर ती नियमितपणे स्वच्छ करा. ती खराब होणार नाही याची काळजी घ्या. तसेच कासवाच्या अंगठी दूषित होण्यापासून वाचवा, नाहीतर ते निष्प्रभ होईल. त्याचा कोणताही शुभ परिणाम होणार नाही.

एकदा तुम्ही बोटांमध्ये ही अंगठी घातल्यावर, ती वारंवार फिरवू नका. जर कासवाने चुकून तुमच्याकडे पाठ फिरवली, तर त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात.

ज्या लोकांनी कासवाची अंगठी घातलेली आहे त्यांनी मांस, मद्य किंवा इतर तामसिक पदार्थ टाळावेत. वाईट आचरण आणि वर्तन टाळावे.

जर काही कारणास्तव तुम्हाला अंगठी काढावी लागली, तर ती काढून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या चरणासमोर ठेवा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us