Vinayak Chaturthi : आज केलेल्या या उपायांमुळे मिळेल भाग्याची साथ, अडकलेले काम लागतील मार्गी

हे ज्योतिषीय उपाय केल्याने एकीकडे आर्थिक संकटातून सुटका मिळते. त्याचबरोबर व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते.

Vinayak Chaturthi : आज केलेल्या या उपायांमुळे मिळेल भाग्याची साथ, अडकलेले काम लागतील मार्गी
श्री गणेश
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 23, 2023 | 1:24 PM

मुंबई : शास्त्रानुसार, बुधवार हा गणपतीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रभावी दिवस आहे. त्याच वेळी, गणेशाला समर्पित चतुर्थी व्रत (Chaturthi Upay) देखील महिन्याच्या दोन्ही पंधरवड्यातील चतुर्थी तारखेला पाळले जाते. या दिवशी गणेशाची यथासांग पूजा केल्याने भक्तांना बाप्पाचा आशीर्वाद मिळतो. तसेच सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात. पुराणात गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हे ज्योतिषीय उपाय केल्याने एकीकडे आर्थिक संकटातून सुटका मिळते. त्याचबरोबर व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते. चला जाणून घेऊया गणेशाशी संबंधित कोणते उपाय केल्याने कर्माला भाग्याची साथ लाभते.

आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी

विनायक चतुर्थीच्या दिवशीही गणेशाला 21 दुर्वांची जोड दुर्वा आणि शेंदूर अर्पण करा. त्यानंतर पूजा करून गणेश स्तोत्राचे पठण करावे. पाठ केल्यानंतर गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा. हा प्रयोग सात बुधवार सतत केला तर व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते आणि लवकरच अडकलेले काम मार्गी लागते.

नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी उपाय

गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी सात कौड्या आणि मूठभर हिरवी मूग डाळ घ्या. हे दोनीही हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधून मंदिराच्या पायरीवर ठेवा. लक्षात ठेवा हा उपाय गुप्तपणे करावा. या उपायाविषयी कोणालाही सांगू नका आणि हा उपाय करताना कोणालाही पाहू देऊ नका. हा उपाय खूप चमत्कारिक असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की हे केल्यावर व्यवसायात नफा होतो. नोकरीत व्यक्तीला बढती मिळेल.

सुख आणि शांती राखण्यासाठी

शास्त्रानुसार घरामध्ये सुख-शांती कायम ठेवायची असेल तर बुधवार आणि चतुर्थीच्या दिवशी शिवलिंगावर हिरव्या मूगाची डाळ अर्पण करा. यासोबत शिव तांडव स्तोत्राचे पठण करावे. हा उपाय केल्याने गणेश प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच गाईंना हिरवा चारा द्यावा. यामुळे कुंडलीतील व्यक्तीची स्थिती सुधारेल आणि आर्थिक लाभ होईल.

सर्व त्रासांपासून मुक्त होण्यासाठी

आयुष्यात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी गरिबांना पैसे दान करावे. गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. बुधवारच्या दिवशी उपवास केल्याने हित शत्रुंपासून संरक्षण होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)