
सोन्याचे अलंकार हे सौंदर्य वाढवण्यासाठी घातले जाते. तसेच ते समृद्धी, शुभता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक देखील मानले जाते. ज्योतिष आणि वास्तु शास्त्रानुसार, जर सोने योग्य ठिकाणी किंवा अवयवावर घातले तर ते केवळ सौंदर्यच वाढवत नाही, तर जीवनात यश, आरोग्य आणि सुख-समृद्धी देखील आणते. असे मानले जाते की, सोने योग्य बोटावर किंवा शरीराच्या अवयवावर घातल्यास भाग्याचे दरवाजे उघडतात, अडचणी कमी होतात.

गळ्यात सोन्याची साखळी घालणे वैवाहिक जीवनात संतुलन आणि मधुरता आणणारे मानले जाते. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात समजूतदारपणा आणि सहकार्य वाढते. तसेच, हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठीही हे लाभकारी मानले जाते.

अनामिका (रिंग फिंगर) मध्ये सोन्याची अंगठी घालणे हे कुटुंबाच्या सुख-समृद्धी आणि संतान सुखाशी जोडलेले आहे. ज्या दांपत्यांना संतानाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा उपाय विशेष शुभ मानला जातो.

रुद्राक्षासोबत सोने घालणे हृदयरोगींसाठी चांगले मानले जाते. हृदय कमकुवत असणे आणि त्यासंबंधित आजारांमध्ये आराम देणारा हा एक साधा उपाय मानला जातो.

ज्या लोकांना करिअर किंवा नोकरीत प्रगती हवी आहे, ते तर्जनी बोटात (इंडेक्स फिंगर) सोने घालू शकतात. हे बोट महत्त्वाकांक्षा आणि निर्णयक्षमतेशी जोडलेले मानले जाते. नवीन नोकरी, बढती किंवा व्यावसायिक प्रगतीची इच्छा असणाऱ्यांसाठी हा उपाय लाभदायक ठरू शकतो.

करंगळी (लिटिल फिंगर) मध्ये सोने घालणे मानसिक शांती आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे सर्दी-खोकला, अस्वस्थता आणि झोपेच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. जे लोक तणावग्रस्त असतात, त्यांना या बोटात सोने घालण्याचा फायदा होऊ शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)