Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा हादरवणारा खुलासा, निवृत्ती घेताच सांगितलं क्रिकेट विश्वातील काळे सत्य, सीनियर खेळाडूंना..

अजिंक्य राहणे यांनी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अजिंक्यने निवृत्ती जाहीर केली. या व्हिडिओमध्ये बोलताना तो भावूक झाला होता.

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा हादरवणारा खुलासा, निवृत्ती घेताच सांगितलं क्रिकेट विश्वातील काळे सत्य, सीनियर खेळाडूंना..
| Updated on: Aug 06, 2026 | 8:28 AM

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने गेल्या आठवड्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अजिंक्यच्या निवृत्तीनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पण आता अजिंक्यकडे काहीच पर्याय नव्हता कारण भारतीय संघ सध्या नवीन खेळाडूंकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. यामुळे अजिंक्यने कसोटीतून निवृत्त होण्याचे ठरविले. त्याने भारतासाठी आपला शेवटचा कसोटी सामना 2023 मध्ये खेळला. निवृत्तीनंतर पहिल्यांदाच एका पॉडकास्टवर बोलताना, रहाणेने कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाच्या संघर्षाबद्दल आपले विचार मांडले. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, मायदेशात झालेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये भारताचा पूर्णपणे पराभव झाला आहे.

अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघावर बारकाईने लक्ष ठेवतो. त्याने ‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टला सांगितले, “मी गेल्या दोन वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही, त्यामुळे मी घरी बसून भारतीय संघाला मायदेशातही सामने हरताना पाहत आहे. मला वाटते की कसोटी क्रिकेटसाठी एक मजबूत मनोबल आवश्यक आहे. तुम्हाला असे खेळाडू घडवावे लागतील आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळावे लागेल. हेच महत्त्वाचे आहे. मला कसोटी क्रिकेटची चिंता वाटते. ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत, त्यावरून आम्हा सर्वांना वाटते की कसोटी क्रिकेट टिकून राहावे. गेल्या 2-3 वर्षांत मी जे पाहिले आहे, त्यानुसार वरिष्ठ खेळाडूंना संघात टिकवून ठेवणे आणि त्यांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. हे विशेषतः भारतीय संघाच्या बाबतीत खरे आहे, जिथे अनेक वरिष्ठ खेळाडू एकाच वेळी संघ सोडून गेल्याने समस्या निर्माण झाली आहे.”

रहाणेच्या मते, आज अनेक खेळाडू आणि संघांना कठीण परिस्थितीत संयम राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो. कोणत्याही संघाचे नाव न घेता तो म्हणाला की, “कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून राहणे आणि कठीण सत्रांमध्ये टिकून राहणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे, जे आता कमी प्रमाणात दिसून येते.  मी त्यांच्यासोबत (गंभीर) खेळलो आहे. जेव्हा ते केकेआरचे प्रशिक्षक होते, तेव्हा मी संघात नव्हतो. ते प्रशिक्षक असताना मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कधीच खेळलो नाही. आम्ही इंग्लंडला आलो असताना आणि भारतातही एकत्र खेळलो.”

भारतीय संघातील जवळपास सर्वच वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाले आहेत. संघात असा कोणीही नाही ज्याने 100 कसोटी सामने खेळले आहेत. केवळ रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांची कारकीर्द 10 वर्षांपेक्षा जास्त आहे. रहाणे म्हणाला, “कसोटी क्रिकेटचे चाहते हे खरेतर क्रिकेटप्रेमी आहेत. गेल्या दोन वर्षांत, जेव्हा नवीन खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये आले आहेत, तेव्हाही माझा विश्वास आहे की कसोटी क्रिकेटला 7-8 वरिष्ठ खेळाडू आणि 2-3 युवा खेळाडूंची गरज आहे. आपण आता जे पाहत आहोत ते हे की, सर्व खेळाडू मुळात नवीनच आहेत. आता क्वचितच कोणी वरिष्ठ क्रिकेटपटू शिल्लक राहिले आहेत.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us