AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: टीम इंडियाला सेमीफायनलआधी मोठा धक्का, कॅप्टन रोहित शर्माला असं लागलं

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

T20 World Cup: टीम इंडियाला सेमीफायनलआधी मोठा धक्का, कॅप्टन रोहित शर्माला असं लागलं
Rohit-sharma Image Credit source: Screengrab
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 08, 2022 | 9:25 AM
Share

मेलबर्न : विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये चार टीम पोहोचल्या आहेत. त्यामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझिलंड या टीमचा समावेश आहे. 9 नोव्हेंबरला पाकिस्त्नान आणि न्यूझिलंड यांच्यात मॅच होणार आहे. तर 10 नोव्हेंबरला टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात मॅच होणार आहे. सध्या टीम इंडिया (Team India) एडिलेड या मैदानात सराव करीत आहे. तिथं टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध (NZ) मॅच होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)सराव करीत असताना जखमी झाला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहित जखमी झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का मानला जात आहे. रोहितच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. विशेष म्हणजे ही जखम गंभीर असल्याचं कोणताही रिपोट अद्याप जाहीर झालेला नाही.

ROHIT SHARMA

ROHIT SHARMA

एडिलेडच्या मैदानात सराव करीत असताना ज्यावेळी रोहितच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी तिथं अन्य खेळाडूही उपस्थित असल्याचं व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. तसेच हाताला जखम झाल्यानंतर रोहित सराव थांबवून एका बाजूला बसल्याचं दिसत आहे.

ज्यावेळी रोहित शर्माला जखम झाली. त्यावेळी रोहितने काहीवेळ विश्रांती घेतली. काहीवेळानंतर तिथं नेटमध्ये रोहितने काही चेंडू खेळल्याची माहिती मिळाली आहे. पुढच्या सामन्यात खेळण्यासाठी रोहित फीट आहे का ? याची सुद्धा चाचणी घेतली जाईल. समजा रोहित शर्माची जखम गंभीर असेल तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल.

विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत टीम इंडियाच्या पाच मॅच झाल्या आहेत. त्यापैकी टीम इंडियाने चार मॅच जिंकल्या आहेत. फक्त एका मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे.

Follow Us
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?