IPL 2026: आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं सोपं गणित फिस्कटलं, अक्षर पटेल म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 51वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवानंतर कर्णधार अक्षर पटेलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

IPL 2026: आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं सोपं गणित फिस्कटलं, अक्षर पटेल म्हणाला...
IPL 2026: आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं सोपं गणित फिस्कटलं, अक्षर पटेल म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 08, 2026 | 10:39 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत 51 सामन्यांचा खेळ संपला असून प्लेऑफचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. पण अजूनही कोणताही संघ प्लेऑफमध्ये जागा किंवा या शर्यतीतून बाद झाला नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धूळ चारली. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 142 धावा केल्या. या धावांचा पाठलाग कोलकाता नाईट रायडर्सने केला आणि विजय मिळवला. या स्पर्धेत सलग पराभवांची मालिका पाहिल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स जोरदार कमबॅक केलं आहे. हा स्पर्धेतील सलग चौथा विजय असून खात्यात 9 गुण जमा झाले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सची विजयानंतर पराभवाची मालिका सुरू आहे. इतकंच काय तर 16 गुणांचं गणितही चुकलं आहे. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

आयपीएल स्पर्धेत केकेआरकडून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला आणि कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ‘धावा कमी पडल्या, फिरकी गोलंदाजांनी खूप चुका केल्या. खूप जास्त स्टेप-हिट्स दिल्या. आम्ही दोन तीन षटकांत चार पाच विकेट्स गमावल्या, त्यामुळे आमची लय बिघडली. आमच्याकडून चूक झाली तर येणाऱ्या फलंदाजांना अडचण येईल. एकापाठोपाठ एक विकेट्स पडल्यानंतर डाव सावरण्यासाठी आम्हाला एक-दोन षटके घ्यावी लागली. आम्हाला पुढच्या वर्षासाठी नियोजन करावे लागेल आणि पुढील दोन सामन्यांमध्ये खेळाडूंसोबत काम करावे लागेल.’

आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने 11 सामने खेळले आहेत. यापैकी चार सामन्यात विजय आणि 7 सामने गमावले आहे. त्यामुळे स्पर्धेत फक्त तीन सामने खेळायचे आहे. आता तीन सामन्यात विजय मिळवला तरी 14 गुण होतील. अशा स्थितीत प्लेऑफमध्ये संधी मिळवणं कठीण आहे. कारण 14 गुणांच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आहे. त्यामुळे टॉपला असलेल्या संघांनी 14 गुणांचं गणित जुळवलं तर तळाशी असलेल्या संघांना गाशा गुंडाळावा लागेल. कारण टॉपला असलेल्या पाच संघापैकी सनरायझर्स हैदराबादने 14, तर पंजाबने 13 गुण मिळवले आहेत. तर आरसीबी, राजस्थान आणि गुजरात टायटन्सचे 12 गुण आहेत.

Follow Us