IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

| Updated on: Dec 02, 2021 | 10:50 AM

भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल.

1 / 5
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल. या दोन्ही संघांमधला हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे, जिथे यापूर्वी अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. भारत या मैदानावर 5 वर्षांनंतर कसोटी सामना खेळत आहे, तर न्यूझीलंड 33 वर्षांनंतर कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.

भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल. या दोन्ही संघांमधला हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे, जिथे यापूर्वी अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. भारत या मैदानावर 5 वर्षांनंतर कसोटी सामना खेळत आहे, तर न्यूझीलंड 33 वर्षांनंतर कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.

2 / 5
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिका जिंकण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. न्यूझीलंडसाठी भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकणे हा ऐतिहासिक क्षण ठरू शकतो, तर घरच्या वातावरणात किवीजवर विजय मिळवून आपले वर्चस्व कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिका जिंकण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. न्यूझीलंडसाठी भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकणे हा ऐतिहासिक क्षण ठरू शकतो, तर घरच्या वातावरणात किवीजवर विजय मिळवून आपले वर्चस्व कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

3 / 5
वानखेडे मैदानावर भारताने शेवटची कसोटी 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्या सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने शेवटची कसोटी 1988 मध्ये खेळली होती, ज्यात त्यांनी भारताचा 136 धावांनी पराभव केला होता.

वानखेडे मैदानावर भारताने शेवटची कसोटी 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्या सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने शेवटची कसोटी 1988 मध्ये खेळली होती, ज्यात त्यांनी भारताचा 136 धावांनी पराभव केला होता.

4 / 5
भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट कोहलीचा घरच्या खेळपट्ट्यांवर कर्णधार म्हणून विक्रम चांगला आहे. त्याने 30 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 23 जिंकले, 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे आणि 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट कोहलीचा घरच्या खेळपट्ट्यांवर कर्णधार म्हणून विक्रम चांगला आहे. त्याने 30 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 23 जिंकले, 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे आणि 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.

5 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना वानखेडेवर होणार आहे. याआधी दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. भारताने मुंबईत आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 11 जिंकले आहेत, 7 अनिर्णित राहिले आहेत आणि 7 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना वानखेडेवर होणार आहे. याआधी दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. भारताने मुंबईत आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 11 जिंकले आहेत, 7 अनिर्णित राहिले आहेत आणि 7 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.