
टीम इंडियाच्या चार युवा खेळाडूंना बीसीसीआयकडून शिक्षा होणार असल्याची माहिती समजत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये या खेळाडूंनी मोठी चूक केली आहे. याचाच फटका म्हणजे बीसीसीआयने या खेळाडूंना वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर निवडलेल्या संघांमध्ये त्यांना जागा मिळाली नाही. कारण आयपीएलमधीस संघांच्या मालकांनीच त्यांची तक्रार बीसीसीआयकडे केलीये.


कदाचित त्यामुळेच काही खेळाडूंची वनडे आणि कसोटी संघात निवड झाली नाही. हे खेळाडू टीम हॉटेलमधून परवानगी न घेता गायब व्हायचे. आयपीएल टीमने त्यांच्याबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली होती.

या चार खेळाडूंची नाव अद्याप समोर आली नाहीत मात्र जेव्हा वेस्ट इंडिज साठीची टी-20 संघ जाहीर होईल त्यावेळी ते खेळाडू कोण हे समजू शकतं.

चार खेळाडू बाहेर नेमके कशासाठी जात होते हे समोर आलं नाही. मात्र त्यांचे काही चुकीचं काम करतानाचे पुरावे मिळाले तर त्यांच्यावर बीसीसीआय मोठी कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही.